AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील फुल गळ होण्यामागची कारणे!
गुरु ज्ञानAgroStar
मिरची पिकातील फुल गळ होण्यामागची कारणे!
🌱मिरची पिकामध्ये फुल गळ होण्यामागची कारणे जर आपण बघितली तर पहिले म्हणजे पर्यावरण किंवा हवामानातील बदल यामध्ये जास्त तापमान, उच्च आर्द्रता, कमी सूर्य प्रकाश पातळी किंवा अनियमित पाणी या कारणामुळे मिरची पिकामध्ये फुल गळ होताना दिसते, परागण जर चांगल्या पद्धतीने नाही झाले तरी फुल आणि फळ गळती होऊ शकते. 🌱पोषक तत्वांची कमतरता: मिरचीच्या पिकाला वाढण्यासाठी आणि फळे देण्यासाठी विशिष्ट पोषक तत्वांची आवश्यकता असते. पोषक तत्वाची कमतरता फुलांच्या गळतीस कारणीभूत ठरू शकते. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या मिरचीच्या रोपाला पोषक तत्वांचे योग्य संतुलन मिळत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. कीटक आणि रोग: पिकावर कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे फुलांची गळती होते. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख